सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी त्यांच्या आजी, आई आणि बाबा यांच्या आठवणींवर लिहिलेले ‘दीप कृतज्ञतेचे’ पुस्तक
आजी, आई आणि वडील याचे असे भावप्रसंग आपल्या पुस्तकात रेखाटले आहेत, की शून्य वैचारिक अंगाने जाणारे हे पुस्तक असले, तरी त्यातील प्रत्येक प्रसंगामागे फार मोठा अमूल्य विचार दडलेला आहे. आपली सनातन मूल्यपरंपरा दडलेली आहे. काही भाष्य न करताच हे प्रसंग वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. हजारो वर्षांचे सातत्य या समाजाला लाभले, ते का? त्याचे गुपित प्रत्येक कालखंडात अशी शेकडो मराठे कुटुंबे शांतपणे जीवन जगत असतात आणि तेच समाजाला स्थैर्य प्रदान करीत असतात….