आज सेक्युलर विचाराने देशात दहशतवादाचे स्वरूप धारण केले आहे. भारत तेरे तुकडे होंगे, अफजल हम शरमिंदे है, तेरे कातिल जिंदे है या घोषणांच्या मागे सेक्युलर म्हणविणारे मेंदू काम करीत असतात. काहीही करून समाजात सामाजिक आणि वैचारीक प्रदूषण निर्माण करायचे आणि त्याचा आधार घेऊन हिंदुत्वावर प्रहार करायचा या साऱ्या पार्श्वभूमीवर अशोक राणे यांनी आपल्या पुस्तिकेच्या माध्यमातून परखड भाष्य केले आहे.