रमेश पतंगे यांचे हे आत्मकथन रूढार्थाने आत्मकथेत मोडणारे नाही. त्यांचा समरसतेचा प्रवास त्यांनी या पुस्तकातून मांडला आहे. ‘समरसता’ ही संकल्पना समजून घेण्याचा गेल्या वीस वर्षांचा त्यांचा प्रवास म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे काही आठवणी आणि समता, स्वातंत्र्य आणि समरसता आकलन करून घेण्याचा वैचारिक प्रवास आहे.