लेखक : विद्याधर ताठे
किंमत : 250/- रुपये
श्री साई बाबांच्या लीला अनंत आहेत. हा ग्रंथ श्री बाबांचे चरित्र नाही. तसेच त्यांच्या समग्र लोकांची गाथा नाही, ही साई बाबांच्या कथासागरातील एक ओंजळ आहे. प्रातिनिधिक लीला, प्रसंग, घटनांचे पुण्यस्मरण आहे. साई बाबांकडे आकर्षित होणाऱ्या नव्या संगणक युगातील युवा नवभक्तांसाठी हा एक ट्रेलर आहे.
साईबाबा शिर्डीत कसे आले, त्याचे स्वागत कसे झाले, त्यांनी पाणी वापरून दीपोत्सव कसा साजरा केला, रुग्णप्रती असलेला त्यांचा करुणभाव, सर्व पशुपक्षी आदी चराचरांबद्दल असलेले बाबांचे प्रेम, सामाजिक सद्भाव, समरसता एवं उपासनांचा समन्वय, अशा विविध विषयांवर लेखकाने सहज आणि सोप्या भाषेत लिहिले आहे.
आजच्या या मोबाईलच्या जागतिक वाचकांना डोळ्यासमोर ठेऊन अगदी अल्प वेळेत सहजपणे वाचता येतील असे आशयघन आणि माहितीपूर्ण लेख या पुस्तकाचे वैशिष्ट्ये आहे.
खास तरुण पिढीसाठी लिहिलेल्या या गाथेची आजच नोंदणी करा.
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858